मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

वैतरणा सहल पाटणे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ .  दिनांक -- १३ नोव्हेम्बर २०२२. रविवार  .

वैतरणा  सहल पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ     दिनांक -- १३ नोव्हेम्बर २०२२. रविवार 
                            अध्यक्ष = श्री . बी. के. अहिरे .  पाटणे . 
                          ---------------------------------------------------------------------------------. 
                            कॊरॊनाने  काढता पाय घेताच सर्वच क्षेत्रात हालचाली सुरु झाल्यात .  मग पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळी तरी मागे का राहावी . रोज सकाळी कट्ट्यावर येणारे सभासद गप्पा-टप्पा करताना बऱ्याच दिवसात आपण कोठे बाहेर पडलो नाहीत , कंटाळा आला आहे घरात बसून नेहमीची उष्टी- खरकटी काढून जीव मेटाकुटीला आला आहे . वगैरे -वगैरे म्हणायचे . मतितार्थ  बाहेर पडायला  हवे . आणि शेवटी सर्वानी एक दिवसीय सहल , सर्वाना सहज परवडेल अशी व सूर्यास्त होईस्तोवर घरी परतता येईल  अशी  म्हणून वैतरणा . दारणा धरण  व्हाया  त्र्यम्बकेश्वर  जावयाचे  निश्चित  झाले. 
                                                                                                                                                                                               दिनांक १३ नोव्हेंबर २०२२  रविवारी क्रेझरने जावयाचे  ठरले .सकाळी ६  वाजता सर्व सभासदांनी नेहमीच्या कट्ट्यावर जमावे . जेवणाचे डब्बे ;पाणी ; औषधे  घ्यावीत . असे ठरले ,  एकदाचा रविवार उजाडला .  त्या दिवशी नेमके सहल प्रमुख  श्री. मोतीलाल बागुल व त्याच्या  श्रीमती  अचानक एका जवळच्या  नातेवाईकाचे निधन झाल्याने  येऊ शकले नाही .    तरी  ही ५   महिला व ५ पुरुष असे एकूण १० सभासद मित्र  सहलीत सहभागी  झाले . बरोबर ६. ५ वाजता  आम्ही पाटणे  सोडले .  चांदवड ;म्हसरूळ ;नाशिक मार्गे ९ वाजता    त्रयंबकेश्वर  गाठले. रविवार असल्याने यात्रेकरूंची  तुफान गर्दी दिसत होती  आम्ही सारे ८०+ असल्याने गर्दीत जाऊन दर्शन घेणे अवघड. शेवटी कळस दर्शन घेऊन आम्ही बाहेर म्हणजे वैतरणा  मार्ग धरला . 
                                 गावाबाहेर पडताच  दुतर्फा पर्वत  रांगा ;मधून    भात  शेती  दिसू लागली.  चौफेर पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार वृक्षराजी ; गगनचुंबी शिखरे . नुकताच पावसाळा संपलेला .त्यामुळे शेतकरी हंगामाची आवराआवर करीत होता. गुरांसाठी वर्षभर पुरेल असा चारा गोळा करून  त्याची साठवण करीत होता . तर गुराखी शेळ्या  मेंढ्याचे कळप चारण्यासाठी बाहेर पडत होता . सकाळ असल्याने तशी सर्वत्र शांतताच दिसून येत होती . पाण्याची तळी ; डबकी छोटेमोठे तलाव ;खळखळणारे झरे   पाहता पाहताच नजर पुरणार नाही असा जलसागर दिसू लागला. तितक्यात कोणी तरी साद घातली वैतरणा आले . अन ते वैतारणाचं होते . 
                            भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भविष्यवेधी ब्रिटीशानी मुबईची  तहान भागविण्यासाठी व मुंबईला  वीज  पुरवठा  व्हावा म्हणून  वैतरणा धरण बांधले   .  धरणाचे स्वरूप ; आकारमान  विस्तीर्ण आणि अनेक टेकड्या मधून  असल्याने इतर धरणा सारखे  एका दृष्टीक्षेपात  दिसून येत नाही  . नैसर्गिक रचनेमुळे सारे काही विलोभनीय झाले आहे . दूरवर पसरलेले पाणी सागरच. लाटांचा कानावर पडलेला आवाज  एक मोहिनी घालतो असे वाटते . 
                      इतक्यात सुरक्षित जागा पाहून गाडी चालकाने  थांबा घेतला .  पाच तासाचा प्रवासाने सर्वाची गात्रे कुरकुरत होती. लगबगीने सारे खाली उतरले. आळोखे पिळोखे देऊन  थकवा झटकू लागले . काही मंडळी मोकळे व्हावे  म्हणून आडोसे शोधू लागली .  सारा  आसमंत  सर्वत्र पसरलेली निळाई . मन आणि डोळे तृप्त . फोटो सेशन  झाले सुरु . महिलांचे ग्रुप फोटो ;पुरुषांचे ग्रुप फोटो ; धरणाचे फोटो  ;पक्षाचे फोटो  सेल्फी फोटो.  मनसोक्त फोटो काढून झालेवर लगेच  फोटो फरवर्डिंग . एकदाचा खेळ संपला . गाडीचा हॉर्न वाजला ; चलो रे चलो  . 

                        आता गाडीने रस्ता  धरला दारणा धरणा चा . घोटी व राष्ट्रीय महामार्ग  . परिसरात तांदूळ  ची शेती ; कारखाने तांदुळा चे .. पुढे मात्र रस्ता  खड्ड्याचा ; धुळी चा  अन कारखान्याचे  धुराचा . पाच -दहा मिनिटात सारे निवळले . पुन्हा दारणा ची निळाई दिसू लागली . 
                            वैतरणा परिसरापेक्षा  दारणा परिक्षेत्र सुधारित  भातशेती ; नागरी वस्ती.  दुकाने ;रेखीव घरे ; बंगले; कारखाने यांची रेलचेल  असलेले  दिसत होते .पुरुष मंडळी यावर चर्चा करीत असताना महिला मात्र घर व एकमेकांची उणीदुणी  यातच  गुंतलेल्या दिसत होत्या . घोटी ते सिन्नर मार्ग  उसाचे   मळे  ; भातशेतीची खाचरे ; भाजीपाला  यांनी समृद्द .  आजू बाजूचे कालवे व बागाईत शेती पाहून दारणा ची चाहूल  लागली ..  समोर धरणच दिसू लागले .  हे धारण  हि ब्रटिशांची च  देणगी . धारण प्रेक्षणीय आहे पण आपल्या शासनाचे  दुर्लक्ष्य  पावलो पावली जाणवत होते . परिसर बेबंद झाडी ; चिखल ; कचरा  यांनी बरबटलेला . सारे निराश झाले . शेवटी एक हॉटेल पाहून बरोबर आणलेले डबे जवळ केले ; काही मंडळीने मात्र  कटरा  माशांची ऑर्डर दिली   
                      सर्वांची वामकुक्षी होताच  आवरा आवर सुरु झाली . हॉटेल चे बिल देऊन झाले . हॉटेल मालक खूप चांगले होते. त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या . आम्ही हि त्याचे  आभार मानले व निरोप घेतला. 
                       आम्ही  बरोबर चार वाजता घरी म्हणजे पाटणे  येथे परतलो . सर्वानी एकमेकांना शुभेच्या  देऊन पुन्हा भेटूया  असे म्हणून निरोप घेतला 
                             


               

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा